Posts

Showing posts from July, 2006

गप्पा

अंधार पडत होता तशी मी लेकीला हाक मारली, 'चला या घरी' 'आई पाच मिंटं' असं नेहेमीचं उत्तर देउन पुन्हा ती गप्पांकडे वळली सुद्धा! `रोज भेटतात एकमेकींना तरी यांच्या गप्पा कश्या संपत नाहीत? काय बोलतात एवढ्या?' असा विचार मनात येता येता, स्वत:चंच हसु आलं. गप्पा कधी संपतात का? `जिवश्च कंठश्च' मैत्रिणींनी रोज गप्पा नाही मारायच्या तर कोणी? गप्पा गोष्टच अशी आहे, चला मारुया म्हणुन नाही जमायच्या त्या. `चल निघते ग' म्हणुन बाहेर पडल्यावर, एकजण फाटकाच्या आतल्या बाजुला आणि दुसरं बाहेर अश्या फाटकाला लटकुन पुढे अर्धा पाउण तास मारल्या जातात त्या ख-या गप्पा. शाळा सुटली की मुलींचे घोळके बाहेर पडतात. ४ - ५ मुली एकमेकींच्यात जरा ही जागा राहणार नाही अशा एकमेकीला चिकटतात आणि जणु सयामीज ट्विन्स असल्यासारख्या एकधडाने रस्त्याने चालतात. २०% बोलणं, ६०% खिदळणं आणि २०% 'गप्प बस!' त्या एक्जीव घोळक्यातुन उत्पन्न होतं, त्या गप्पा. आता खरं तर स्कुल बस ने मुलं ये जा करत असल्यानं ही प्रथा मोडीत निघते की काय अशी काळजी लागली होती पण सांगायला आनंद होतो की मुली या मुलीच आहेत फक्त `बावळट' च

हक्क!

मुंबईत झालेल्या घटनांनी सुन्न व्हायला झालं. अतिशय थंड डोक्याने कोणी इतक्या जणांना मारायची योजना बनवु शकतो ती प्रत्यक्षात आणु शकतो हे झेपणंच जड गेलं. मुंबईकर त्याच्या स्वभावधर्मानुसार वागले. कोणी आपल्या कामाचं नाही हे त्यांना चांगलं माहीत आहे. त्यांनीच एकमेकांचे अश्रु पुसले आणि चालु लागले. कोणत्याही युद्धात बळी पडतात ते निरपराध असहायच! मला तर कधी कधी समजत नाही की ह्यांचं कौतुक करावं की त्यांनी काही किमान अपेक्षा बाळगु नये या बद्द्ल रागवावं ह्यातुन सवरते आहे तोच लक्षात आले की आपला ब्लॉग चालत नाहीये. आधी वाटले की व्यत्यय आहे पण मग खरी गोष्ट समजली. हा म्हणजे चोर सोडुन सन्यासाला सुळी देण्याचा प्रकार! `आविष्कार स्वातंत्र्याची मुस्कटदाबी' आहे ही! जाम वैतागले मी. मला पोस्ट करता येत आहे कारण ते संकेतस्थळ वर्ज्य नाही झालेले पण वाचता येत नाही. तणतणुन "वर्ड्प्रेस" ला हलायचा विचार केला. पण एक मिनिट.... का म्हणुन? का म्हणुन मी हलायचे इथुन? नोहे! नो वे! तेंव्हा रामगढ के वासियों चाहे गब्बर कुछ भी करले ... जब तक है मुमकिन, मै ब्लॉगुंगी!!! तुमचा लोभ असावा ही विनंती!

अनुस्वाराच्या निमित्ताने

मिलिंद च्या ' अनुस्वार ' या नोंदीच्या अनुषंगाने केलेल्या विचारानं मला काही मुद्दे सुचले. ते मी त्यांच्या नोंदीवर टिप्पणी म्हणुन टाकलेच. पण अधिक कायमस्वरुप नोंद असावी म्हणुन पुनरावृत्ती. पण त्या आधी -- मी काही माहितगार अथवा भाषेची विद्यार्थीनी नाही हे ध्यानात घ्या. १. माझ्या मते अं हा ओष्ट्व्य नाही. तो अनुनासिक आहे. ओठाचा वापर न करता त्याचा उच्चार करता येतो. २. हा अनुस्वार बेटा चुकीच्या कळपात शिरल्यासारखा वाटतोय खरा! म्हणजे इतर बाराखडी ही त्याच व्यंजनाचे आविष्कार आसतात तर हा बेटा पुढच्या व्यंजनाला जाउन चिकटतो आहे. ३. अनुस्वाराप्रमाणे 'र' या व्यंजनासाठीही किती वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे आहेत. आणि ती बाराखडी प्रमाणे परत बदलतात. जसे क्र आणि कृ - उ उलटा फिरवलेला. शिवय तोर्यात असे न लिहिता तो-यात असे लिहीलि जाते. आणि जिथे कंपित मधला अर्धा म पुढ्च्या क वर दर्शवला गेला तर सर्वात मधला अर्धा र मागच्या व वर. ४. माझे असे एक मत आहे की गेल्या शतकच्या सुरवातीला मराठी व्याकरणावर जे संस्कार झाले त्यावर इंग्रजीची छाप आहे. म्हणुन मराठीत दंड न वापरता . पूर्णविराम (Fullstop चे भाषांतर?)

अय्या बाई तुम्ही?

काल भाजीवालीसमोर घासाघीस करताना, शेजारी उभ्या असलेल्या बाईंकडे बघितले तर त्य मोठे कुंकु लावलेल्या हस-या बाई ओळखीच्या वाटल्या. एकदम ओळख पटली की या विज्ञानमंचच्या कुलकर्णी बाई. मी लगेच 'स्कर्ट-ब्लाउज, दोन वेण्या' मोड मध्ये गेले. आणि म्हणाले, "अय्या बाई तुम्ही!" बाईंना अश्या बावळटपणाची बरीच सवय असावी. त्यांनी ओळख विचारली, गप्पा मारल्या. त्यांच्या बरोबर आलेली त्यांची नात चुळबुळ करायला लागली तसे बोलणे आवरते घेत आम्ही आपापल्या मार्गाला लागलो. पण या आजी - बाई मला पटेचनात. नातीची समजुत काढणा-या आजी आणि माझ्या बाई यात मला दुवाच सापडेना. खरं तर गोरेगावच्या मराठी शाळेत शिकल्याननंतर माझ्याही आयुष्याने वळणं घेतली होती की. मन चटकन शाळेत धावलं, तो पेल्टोफोरमचा पिवळा सडा पडलेला तपकिरी रस्ता. भलं थोरलं आवार, बैठी शाळा, आणि त्यावर अम्मल गाजवणा-या आमच्या सगळ्या शिक्षिका. त्यांनी खरच आम्हाला घडवलं, नियमाबाहेर जाउन पुस्तकं दिली, विषयांची गोडी लावली. माझ्या केळकर बाईंमुळे शास्त्र विषयाची गोडी लागली. त्या कायम वर्गात तास सुरु असताना पुस्तक उघडलं की रागवायच्या आणि उत्तर आलं नाही की घरी पुस्त